अशाच एका निवांत क्षणी,
वाटले..... पहावा विचार करुन,
अवति-भोवती बरेच जण,
मी माझे कुणा म्हणू?
पण हाय!!! का असे विपरित घडले,
खरेच, माझे म्हणावे असे कुणीच ना वाटले!
असे कसे होईल? यात माझेच काही चुकले जणू!!!!
अवति-भोवती बरेच जण,
मी माझे कुणा म्हणू?
तसे सगळेच आहेत , आयुष्याच्या सोबतीला,
पण तरिहि मी एकटी, एकटीच या वाटेला!
रित्या ओंजळीचा या एकटेपणाच धनू!!
अवति-भोवती बरेच जण,
मी माझे कुणा म्हणू?
एकही माणूस ना जोडता यावा , इतक्या का कोत्या मनाची मी?
की मलाच ना कुनी जवळ केले, इतक्या कमनशिबाची मी?!!
काय हे असे कोडे सुटेना , आनखिनच गोंधळात मनू!!!!
अवति-भोवती बरेच जण,
मी माझे कुणा म्हणू?
......... आरती
No comments:
Post a Comment